Monday, August 17, 2009

स्मरणशक्ती व एकाग्रता वाढवण्यासाठी

माझा मोठा मुलगा १८ वर्षाचा आहे. त्याची स्मरणशक्ती व एकाग्रता वाढावी यासाठी काही घरगुती उपाय सुचवा.

रात्री ३-४ बदाम पाण्यात भिजवून सकाळी सोलून रोज खायला द्यावेत. रोज सकाळी पंचामॄत (२ चमचे तूप, १ चमचा मध, १ चमचा ताजे दही, १ चमचा साखर, ४-५ चमचे दूध यांचे मिश्रण) द्यावे. घरी बनवलेले लोणी व साखर खाण्यास द्यावी. तसेच रोजच्या आहारात घरी बनवलेल्या साजूक तुपाचा सामावेश असावा.
सूर्यनमस्कार घालायला शिकवावे. रोज रामरक्षा, भगवदगीता, पाढे वगैरे म्हणण्याचा सराव ठेवावा.

- डॉ. श्री बालाजी तांबे

No comments:

Post a Comment